जानबाची फजिती व शांता व वज्रेला शिक्षा
लेखक : निशिकांत हारुगले
सकाळ झाली. शांतीला जाग आली. तिने डोळे चोळत पाहिले. तेव्हा ती घरी असल्याचे जाणवले. तिला वज्राच्या घरून इकडे आणलं आहे. हे तिला जाणवलं. कालचा राग होताच. तिला उठलेलं पाहून तिची आई तिला म्हणाली, “ झाली झोप उठ व दात घास इसवान काढते. अंघोळ कर.”
शांती बोलली, “ मला नाही करायची.”
तेव्हा तिची आई म्हणाली, “ अजून राग गेला नाही वाटत. बाईसाहेबांचा.”
तस तिन उठून अंथरूण काढलं. व ती दातून घेऊन ब्रश करायला न्हाणीघरात गेली. तिथल्या चुलीवरल्या हंड्यात पाणी चांगलच तापलं होत. तीने दात घासातच पाणी बादलीत काढल. व ती अंघोळ करायला गेली. तीने दात घासले. व अंघोळीच इस्वान काढल. ती अंघोळ करतेय पाहून तिची आई तिच्या पाठीला साबण लावायला आली. आज सोमवार होता. ती डोक्यावरून अंघोळ करत होती. तिने सर्व केस सोडले होते. आईने स्पर्श करताच तिने तिचा हात झिडकारला. व म्हणाली, “ माझी मला येते अंघोळ करायला. व आईच्या हातचा तांब्या तिन काढून घेतला. मुलीच्या अंगावरल्या माराचे वळ पाहून तसेच शांतीचे कडवे बोल ऐकून तिला वाईट वाटले. ती ओल्या डोळ्यांनी आतमध्ये आली. इकडे शांतेनं अंघोळ आटोपली. वज्रा तिला बोलावय आली. पेठच्या बाहेर महादेवाचं देऊळ होत. त्या शिवारातील भात खाचरात ते शोभुन ते प्राचीन मंदिर दिसत होते. त्या दोघींना शिनभक्ती आवडायची. वज्रीनं तामनातून पूजेचं साहित्य आणलं होत. शांतिन त्यात साळी, गंध, फूले व साखर मिसळली. व त्या दोघी निघाल्या. वाटेत लागणाऱ्या झुळूझुळू ओढ्याच्या पात्रातील कातळ दगडावर वज्रीन तामन ठेवले. व दोघींनी आपले पाय धुतले. इतक्यात तिथे सदू पाटील म्हस धुवाय आला होता. ती म्हस त्यां दोघींकडे डोळे वटारून पहात होती. ते पाहून वज्रा घाबरली ती शंतिला म्हणाली,
“ ती म्हस बघ कशी बघतेय. मारायलाच येईल अस वाटतय.”
शांती म्हणाली, “ घरात म्हसी असताना घाबरतीस कसली. आली तर मारायचा दगड. जाईल पळून. लई नखरे केलं तर बाजारच दाखवायचा.”
तेव्हा सदू म्हणाला, “ बाजार दाखवायला फुकट नाही आणली.”
इतक्यात ती म्हस मारायला त्या दोघींकडे धावली. तेव्हा शांतीने एक दगड मारताच घाबरली व कोंडिकडे गेली.”
वज्रा, “ काय मामा मारली असती नव्ह.बांधून आणता येत नाही.”
सदुमा, “ तशी मारत नाही. फक्त धावती नुसती अंगावर.”
तेव्हा शांती म्हणाली, “ हो का धावते व शिंग अंगाला लावते म्हण की म्हाताऱ्या, म्हणूनच सून गोठ्यात झोपवती तुला बेवड्या जा धू जा तिला.”
वज्रा, “ शांते मोठ्या माणसांना अस बोलू नये.”
शांती, “ चल गप घे ते तामण . तस वज्रीन तामण घेतल व त्या पुढे गेल्या. पुढे त्यांनी बेलाच्या झाडाची पाने व काही अनंताची फुले घेतली. व त्या पुढे निघाल्या. रस्त्याच्या दोन्ही बाजूस फुललेली फुलझाडे व शिवारी वाऱ्यावर डोलणारे ऊस मन प्रसन्न करत होते. कोकिळेच कुजन ऐकू येत होतं. मंदिराकडे जाणाऱ्या त्या वाटेवर सुखद गारवा मिळत होता. देवाला गेलेली माणसं परत चालली होती. वाटेत त्यांना ज्ञानदेव पाटलाची साक्री भेटली. वज्रा तिला म्हणाली, “ आम्हाला चुकवून आलीस व्हय.”
तेव्हा साक्री त्यांना म्हणाली, “घरात मरणाचं काम हाय. आई आजारी हाय. व बाबा शेताला गेल्यात. भगाटल्या पासून शेणा पासून ते स्वयंपाकापर्यंत मलाच पाहावं लागत. येताना तुमच्या घरात हाक मारली. तेव्हा तू अंघोळ कराय गेल्याचं समजल. व शांतीच्या घरातील पराक्रम माहीत झाला म्हणून तिकडे गेलो नाही. शांता कशी आहेस. आईने लई मारलं म्हण.”
शांती म्हणाली, “ तुला ग कोणी सांगितल.”
साक्री म्हणाली, “ रात्री जान्या म्हणाला.”
हे ऐकताच शांती चिडून म्हणाली, “तूझ्यापर्यंत बातमी पोहोचली म्हणायची तर. त्या जान्याला म्हणावं शाळा सोड व गावची पोस्टमनकी करत फिर जा. तू आता जा. तुला घरी कामे असतील.”
तिच्या डोक्यात आता महादेवाऐवजी जान्याचा विषय घोळायला लागला. त्याला कसा धडा शिकवायचा हाच विचार करू लागली. वज्रा तिला म्हणाली, “ झाल गेलं विसर.”
शांति, “तुला काय जातंय बोलायला मार मला बसलाय.”
त्या दोघी मंदिर परिसरात पोहोचल्या. तेथील आवारातील अंधार बावीजवळून त्या पुढे आल्या. तेथील जुनी व मोठी झाड अरण्यागत होती. रात्रीच तिथं कोणी जात नसे. हिंस्र स्वापद तसेच सापांचा तिथे वावर असे. त्या दोघी देवळात गेल्या देव दर्शन घेतलं. पूजा केली. गणू पुजाऱ्याकडून तीर्थ घेतल. मंदिराच्या भोवती अर्ध प्रदक्षिणा घालून त्या घरी निघाल्या. वाटेत वज्रा तिला म्हणाली, “ आज शाळेला येणार ना.”
शांती उत्तरली, “ न येऊन कसं चालेल. आज तर माझं महत्त्वाचं काम आहे.”
“ कोणत महत्त्वाचं काम?”
“ कळेलच तुला.” ती हसली. व त्या दोघी घरी परतल्या. घरात आल्यावर आई शांतीला म्हणाली, “शाळेची वेळ झालीय. जेवून घे.”
शांती, “ नको मला भूक नाहीये.”
“ का, बाजारी वड्यानी पोट भरले वाटतं. नखर नकोत गुमान जेव. व जा शाळेला. करणी तुझी व बोल मला. कालचं सट्ट कमी पडलं वाटत.” आई करड्या आवाजात बोलली.
तेव्हा शांतीन शस्त्र खाली ठेवणं पसंत केलं. व गपचुप जेवून तिने आपले आटोपले. व दप्तर घेऊन ती वज्राच्या घरी आली. वज्रा तयारच होती. त्या दोघी एकत्र शाळेत गेल्या. शाळेत मैत्रिणीत गप्पा रंगल्या. थोड्या वेळानं प्रार्थनेची बेल झाली. प्रार्थना झाली. प्रार्थनेच्या वेळी तसेच वर्गात सुद्धा शांतीच लक्ष नव्हते. बाराची छोटी बेल झाली. शाळेजवळील बोळात जान्या गेल्याच लक्षात येताच शांती पाठोपाठ गेली. व तिने त्याला बडवायला सुरुवात केली. जान्या मोठ्याने ओरडायलाला लागला. तस त्याच्या तोंडात रुमाल कोंबला. तस तिन दोन चार लाथा पण हाणल्या तिची दोन चार काकन पण फुटली. त्याची तमा न बाळगता तिन त्याला लई चोपला.. खिडमिड असल्याने तिच्यापुढे तो टिकला नाही. तो खूप घाबरला व भेदरला. मन शांत झाल्यावर ती तेथून बाहेर आली. व मुलींच्या घोळक्यात सामील झाली. वज्रा तिला शोधत होती. ती तिला भेटल्यावर म्हणाली, “कूठे होतीस मगाठावण उडकतोय.”
“ गेले होते उसने घेतलेले पैसे फेडायला. व्याजासकट परत.”
तिचे ते कोड्यातील बोलणे वज्रेला समजले नाही. इतक्यात बेल झाली. मुले वर्गात गेली. जानबा पण आला. त्याचा अवतार व फाटलेला खिसा व हाता पायावरले वळ बघून मुले हसायला लागली. वज्रा समजून गेली ही बया कुणाचे उट्टे व उसने फेडाय गेली होती. गुरुजी ऑफीस मधून वर्गात आले. मुले शांत झाली. त्यांनी वर्गातून नजर फिरवली. त्याना एका कोपऱ्यात भेदरलेल्या अवस्थेत रडणारा जानबा दिसला. गुरुजींनी आपल्या जवळ बोलावून त्यास विचारले. पण तो काहीच बोलला नाही. त्याला शांतीचे शब्द आठवले. ‘जर यातील काय बी गुरुजींना सांगितलस तर वटाडाच्या विहिरीत ढकलून देईन.’ त्याची नजर मात्र शांतीकडे होती. गुरुजी समजायचे ते समजले. त्यांनी त्याला जागेवर बसायला सांगितले. व शांता व वज्रा दोघींना उठवून दोघींना सहा सहा छड्या दिल्या व वर्गाबाहेर अंगठे धरून उभा रहायला सांगितले. हे सर्व व्यंकूने पाहिले. चांगले तासभर अंगठे धरल्यावर त्या दोघींना वर्गात घेतले. वज्रा निमूटपणे एक शब्द न काढता. आपल्या जागेवर जाऊन बसली. पहिल्यांदाच तिला शांतेची संगत नडली होती. मराठीच्या पुस्तकातील ‘कोरड्या सवे ओले जळते' या म्हणीची प्रचिती तिला आली होती. दुपारची सुट्टी झाली. वज्रेन शांतपणे आपला डबा व्हरांड्यात एका कोपऱ्यात बसून खाल्ला. तो खाताना शांती कोरट्याची चटणी देण्यास आली. मात्र तिने ती नाकारली. इकडे हुशार वज्रेला शिक्षा केल्याची खंत गुरुजींना वाटत होती. त्यांनी शाळा सुटन्या अगोदर एका मुलाला वज्रेस स्टाफरूम मध्ये बोलावले. वज्रा घाबरली कशाला बोलावले असेल. ती दबक्या पावलाने स्टाफरूम गेली. वज्राच्या मागे आलेल्या मुलांना गुरुजींनी वर्गात जायला सांगितले. मुले निघून गेली. शांती मात्र दाराच्या मागे उभा राहिली. गुरुजींनी तिला ओरडताच ती नाईलाजाने वर्गात गेली. वज्रा स्टाफरूममध्ये आली. गुरुजींनी तिला बाकावर बसायला सांगीतले. तिला रडू कोसळले. गुरुजी तिला म्हणाले, “ तू हुशार मुलगी आहेस व शांतीपण, पण तू अभ्यास करतेस, मात्र त्या शांतीची हुशारी मारामारी पासून भांडण तंट्यापर्यंत आहे. तू वर्गात प्रथम येतेस. मात्र या शांतेच्या सहवासामुळे तुझे नुकसान होते. तू तिचा सहवास सोड व तुझा मार्ग बदल. ती आग व तू पाणी तुम्हा दोघींचं पटतच कस. यावर विचार कर व निर्णय घे. कारण सहामाही परीक्षेत तुला मार्क कमी भेटले. ते या बयेच्या नादाने. आता डोळे पूस, अन् जा वर्गात. वज्रा तेथून डोळे पुसत बाहेर आली. व वर्गात गेली. आपले दप्तर नीट केले. इतक्यात शाळा सुटली. मुले वर्गाबाहेर पडली. वज्रा निमूटपणे घरी चालली. शांतीन तिचा हात धरला. पण तिने तो झिडकारला. व ती घरला निघाली.
क्रमशः पुढे…