वज्रा व शांतीची घुसमट लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
वज्रा व शांतीची घुसमट लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

बुधवार, १९ ऑक्टोबर, २०२२

कथा वाकाट खोर्याची भाग ५

 5)शांता व वज्रेची घुसमट.

लेखक : निशिकांत हारुगले.

शांती वज्रेच्या घरातून आली. तिने केलेल्या श्रमावर पाणी पडले होते. ती आपल्या घरच्या खिडकीत बसून स्पुंदू लागली. दामाजीनी विचारले, “काय झालं रडायला.”

तेव्हा तिन वज्रेसंग अबोला व इतर घटना सांगितली. ते ऐकून दामाजी अश्चर्याने म्हणाले, “ काय तूम्ही दोघी बोलत नाही. सूर्य पश्चिमेला उगवला की काय? माझा विश्वास बसत नाही.”

शांती म्हणाली, “ अण्णा यावर उपाय सांगा.”

दामाजीपंत म्हणाले, “ हे बघ तुझ्यामुळे तिला शिक्षा झाली. मग ती चिडणारच. व अबोला धरलाय ना. आता थोड दिवस शांत रहा. व तिच्याशी मवाळ होऊन बोल. तुझ वागणं सुधार. मग बोलेल ती.”

त्याचं हे बोलण स्वयंपाक घरात बसून सुंदरा ऐकत होती. ती म्हणाली, “ कसले धडे देताय ती शांती नाही अशांती आहे. एक वेळ दगडावर परिणाम होईल पण या मुलीवर नाही. एक दिवस मिरी वाटेल डोक्यावर मग कळेल.”

तिचे बोल ऐकूण शांती म्हणाली, “सारखं मला पाण्यात पाहतेस. अण्णाच्या नाही पण तुझ्या निश्चित वाटीन. त्या पण काळ्या नाही तर पांढ-या व ती वज्रा स्वतःला काय समजते. ती बोलल्या शिवाय मी बोलणारच नाही. व त्या गुरुजींना पण बघून घेते, बघच तू. स्वतःला ब्रम्हदेव समजतो काय?” आम्हा दोघींमध्ये नारद होऊन भांडण निर्माण केलयं. त्या जान्याचा पुळका तेला असतो. त्या जान्यान मागल्या आठवड्यात सुताराच्या सविताला धक्का दिला होता. तेव्हा कुठे गेला होता याचा न्यायीपणा. स्वतला काय रामशास्त्री समजतो काय. याच्या शास्त्राची कात्रीच करते. की नाही बघ.” बोलून ती न्हाणीघरात गेली व चांगलं बारडीभर पाणी तिन उपसून हातपाय धुतले. दोरीवरील टॉवेलने हात पाय पुसले. व जेवण खोलीत आली. थाबड्यातील भाकरी, घेऊन त्यावर श्रावण घेवड्याची भाजी घेतली. व शिक्यावरील दही घेऊन लगबगीनं खाऊ लागली. ते पाहून सुंदरा म्हणाली, “ “ अग, हळू जेव की, काय कुत्र बित्र माग लागलं की काय?” शांतीने शाळेत जाण्याची आपली वेळ झाल्याचं सांगितल. तेव्हा सुंदरा तिला म्हणाली, “ काय दिव लावणार आहे कुणास ठावूक. त्या वज्रेकडून काही तरी शिक. तुझ्या पेक्षा एका वर्षाने मोठी आहे. पण घरकामासकट शेण घाण पण काढते.”

तेव्हा शांती म्हणाली, “ मग सांग जा बाबांना दोन म्हशी पाळायला. तू धार काढ. मी शेण काढते. मग दोघे जा वैरण वढायला.”

तेव्हा शांतीची आई म्हणाली, “उलट बोलण्यात व टोचण्यात पाहिलं नंबर येईल बघ.” तिच्या बोलण्याकडे लक्ष न देता शांतीने आपले आवरले. नट्टापट्टा करून ती शाळेला निघाली. जाताना तिने वज्रा गेल्याची खात्री करून घेतली. व शाळेला निघाली. शाळेत गेल्यावर एखाद्या साळसूद बाईसारखी एक कोपरा धरून ती बसली. वज्रेन मात्र तिच्याकडे पाहिलं पण नाही. त्यामूळे शांतीचे पित्त खवळत होते. पण तिनं न बोलताच शांत राहणे पसंत केले. त्या ददोघतील अबोला मुलांच्या व गुरुजींच्या लक्षात आला. पण त्यांनी याकडे दुर्लक्ष केलं. जानबाला या अबोलपनाचा खूप आनंद झाला होता. तो काही ना काही कारण काढून तो वज्रेच्या जवळ जाऊन गुलूगुलू बोलत असे. शांतीने या त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले. संध्याकाळ झाली. शाळा सुटली. त्या दोघी वेगवेगळ्या घरी आल्या. त्यांच्यातील अबोला काहीकेल्या मिटत नव्हता. दोन चार दिवस झाले. वज्रा बोलत नाही म्हंटल्यावर आपण एकदा बोलवून पहावं असे तिला वाटले. तिने आणखी एकदा प्रयत्न करायचा ठरवल.

रविवारचा दिवस उजाडला. वज्रेन आज शेताला जायचा निर्णय घेतला. शेतात उसाची भांगलन चालू होती. आज काहीकेल्या घरात थांबायचं नाही. असं तिने ठरवलं. व ती आईच्या पाठी लागली. कारण शांतीपासून तिने अबोला धरून चार-पाच दिवस काढले होते. आज सुट्टीचा दिवस होता. आज दिवसभर कसा घालवायचा असा प्रश्न तिच्यापुढे होता. आई सकाळपासून कामात होती. तिला घरकामात तिने बरीच मदत केली. व आता शेताकडे न्यायसाठी ती लाडीगोडी लावत होती. तेव्हा आईने तिला व्यंकूसोबत दुपारी जेवण घेऊन येण्यास सांगितल. व आई शेताला गेली. तेव्हा पासून ती दुपार होण्याची वाट पाहू लागली. दुपार झाल्यावर आजीकडून भाकरी बांधून घेऊन ती दोघे बहीण भाऊ शेताच्या वाटेला लागलीत. त्याना शेताला जाताना पाहून न पाहिल्यासारखं शांतीन केलं. ती शेताला गेल्यावर आपल काम आटोपून शांती साकरीच्या घरला गेली. साकरी धुणे धूत होती. शांतीला पाहून साकरी म्हणाली, “ शांते लवकर घरातलं काम आटोपल वाटत.” “काही नाही ग झालंय काम पण घरात करमत नव्हत. म्हणून आलेय.”

साकरी म्हणाली, “ तुझ व वज्रेच जास्तच तानलय.”

तेव्हा ती म्हणाली, “ हे बघ साकरे मी तुझ्याकडे आलेय. ते या विषयावर बोलाय नाही. मला करमत नाही म्हणून आले. तर तू माझ्या जखमेवर मिठ चोळू नको. तेव्हा साकरी इकडल्या तिकडल्या गप्पा मारू लागली. साकरीला मात्र शांतीच वागणं खटकत होत. कारण तिने एकदाही वज्रेचा विषय काढला नाही. त्यामुळे त्या दोघींत मोठी दरार पडत चाललीय याची जाणिव तिला झाली. व या दोघी मैत्रिणीना एकत्र आणायचे तिने ठरवलं. व त्यांच्यात बोलचाल घडवून आणायची तिने मनात ठरवलं. थोडावेळ गप्पा मारून शांती घरी निघाली. जाता जाता आपण उद्या सुट्टी असलेने धुणं धुवायला ओढ्याला जाऊया अस साकरी म्हणाली. तेव्हा शांती बर बर असे म्हणाली. व घरी गेली. शांतीने जरी विषय काढला नसला तरी तिची अस्वस्थता साकारीला जाणवली.

क्रमशः. पुढे……

 


कथा वाकाटखोर्याची भाग २५

 २५)दादाची सायकल लेखक :  निशिकांत हारुगले. व्यंकू आता खूप मोठा झाला होता. तो कॉलेजला जात असे. घराच्या गरीब परिस्थितीमुळे वज्रेला शाळा सोडावी...