२०) बाजाराचा दिवस अन् टवाळखोरांची गंमत लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
२०) बाजाराचा दिवस अन् टवाळखोरांची गंमत लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

गुरुवार, ८ डिसेंबर, २०२२

कथा वाकाटखोर्याची भाग २०

 २०) बाजाराचा दिवस अन् टवाळखोरांची गंमत

लेखक :  निशिकांत हारुगले

मुली आता चांगल्याच वयात आलेल्या होत्या. तरुणपणात त्यांचं लावण्य खुलत होत. त्यांना स्थळे चालून येत होती. घाटी भागात मुली वयात आल्यावर त्यांच्या आई वडिलांना त्यांच्या लग्नाची काळजी लागत असे. साकरीला पाहायला राधानगरीकडील एक मुलगा आला होता. त्याचे दात जरा पुढे आलेले होते. त्यावेळी साकरीला नटवायला तिच्या मैत्रिणी जमल्या होत्या. तेव्हा त्याने नवरीला पाहताना साकरीला पसंत न करता त्याने वज्रेला पसंत केलं. तेव्हा एकच गोंधळ उडाला. वज्रा रडायला लागली. तेव्हा नवरदेवाची कशीबशी समजूत काढण्याचा प्रयत्न केला. पण तो तिचं पोरगी पसंत आहे. असे म्हणू लागला.जमलेल्या बायका वज्रेला आत बोलावून म्हणाल्या.” कशाला पुढे पुढे मिरवतीस तू कलमडलीस अन् साकरीच लगीन मोडल.”

तेव्हा साकरीचा बाप आत आला. त्यान वज्रेला बायकांनी धारेवर धरलेल पाहिलं व त्यो म्हणाला, “कशाला त्या पोरीला बोलता. तिची काय चूक आहे. गेला तर जाऊ दे. साकरीला एकापेक्षा एक स्थळे आणेन मी.”

इतक्यात ती मंडळी गेली. साकरीन सुटकेचा निस्वास टाकला. ती लगेच म्हणाली, “ मला तो फावड्या पसंत नव्हता. फावडे दात त्याचे, त्याने काय मी शेण काढू?”_मात्र या सर्व गोष्टीचा वज्रेवर खूप परिणाम झाला. व तिने ठरवले की आपण कधी कोणाच्या लग्नाच्या ठरावाला जायचं नाही.

 पण जसे तरुणवयात यावे तशा जबाबदाऱ्या पणं वाढतात. वय होत आल्याने पार्वतीला बाजाराला जायला जमत नव्हते. त्यामूळे घरचा बाजार वज्रेचा भाऊच बघत असे. पण कधी कधी तरी वज्रा ही बाजाराला जात असे. एके दिवशी बाजाराला जायची पाळी वज्रेवर आली. ती शांती व साकरी तिघीही बाजाराला निघाल्या. बाजाराला जाताना त्याना नदीच्या वाटेने जावे लागे. पण त्यांनी त्या जवळच्या मार्गाने न जाता कच्या सडकेने जायचे ठरवले. दुपारची उन्ह चढू लागली होती. चालून चालून उन्हाने कायली व्हायला लागली होती. वाटेत कुठेतरी झाडाखाली किंवा राईत थांबत त्या पुढे निघाल्या. बाजार पेठेत आल्यावर त्या तिघी बाजार करण्यात गुंग झाल्या. सर्व पेठ फिरून मालाची चौकशी करत त्या पेठत खालपतुर गेल्या. गारगोटी बाजारात मालाची आवक वाढल्याने दर स्वस्त होता. बाजारातील वस्तू खरेदी करत त्या पेठेच्या मध्यभागी आल्या. तिथं गणू शेटच हॉटेल होत. त्याच्या हॉटेलात भज्जी खूप चविष्ट असत. शांती वज्रा व साकरीला म्हणाली, “ चला आज गणुशेटच्या दुकानावर धाड टाकायची .”

तेव्हा वज्रा म्हणाली, “ माझ्याकडे मोजकेच पैसे आहेत मी काही नाही.” तस साकरीन तिच्या नकार घंटेत आपला नकार मिसळला. तशी शांती चिडली. व म्हणाली, “ आता इथच थांबायचं तुमचा एक रुपया नको. मी आणतो भज्जी.”

असे बोलून तिने आपल्या जवळील पैसे पाहिले. पण ते थोडे होते. तेव्हा ती म्हणाली, “ मी आमच्या दुकानात जाऊन येतो.”

तिचे बोलणे ऐकून साक्री म्हणाली, “ नको तुझे आम्हाला दुकानातले पैसे, हे घे माझे. व जा घेऊन ये भज्जी.”

वज्रा ही आपले देऊ लागली. तेव्हा शांती म्हणाली, “ नको तुमचे पैसे वाटेला डोकं खाशीला. मी आणते दुकानातून.”

असे बोलून ती दुकानाकडे गेली. पेठतून वाट काढत ती दुकानात पोहोचली. दुकानात बाजार असल्याने खूप गर्दी होती. ती थेट गल्ल्यावर गेली. व तिने आपले बाबा दामाजीपंत यांकडे पैसे मागितले. दामजीपंत म्हणाले, “ घरी ठेवले होते की.”

शांती म्हणाली, “ ते तर केव्हाच संपले?.”

तेव्हा दामाजीपंतानी गल्ल्यात हात घातला व तिला पन्नास रुपये दिले. व सांगितले रात्री हिशेब पाहिजे.”

शांती लगेच चिडून म्हणाली, “काही पळून जात नाही, पोरगा झाल्यापासून बघतेय. लई हिशेब विचारताय. ठेवा लेकाला साठवून. मी काय लोकाची धन नव्ह.”

शांतीचे बोल दामाजीपंत यांना चांगलेच झोंबले.तिला पुढे काही न बोलता ते गप्पच राहिले.

तशी शांती दुकानातून बाहेर आली. व गर्दीतून वाट काढत निघाली. तेव्हा तिला कोणीतरी आपल्यावर पाळत ठेवतेय असे वाटले. तशी ती पुढे गेली. गणूशेटच्या दुकानाबाहेर एका झाडाखाली वज्र व साकरी उभा होती. ती तडक आपल्या त्या मैत्रीणी जवळ आली.

 गर्दीतून आल्याने ती खूप घामावलेली होती. तिने वज्रा व शांतेजवळ पोहोचली. व चला म्हणाली. तेव्हा त्या नको भज्जी, वेळ होईल जाऊया. पायपण दुखतायेत. तेव्हा तिने त्यांच्या रट्टयाला हात घातला. व म्हणाली, “ मी झडती देऊन आलोय. अन् तुम्ही इथे नाटक करू नका.”

त्या दोघींना घेऊन ती हॉटेलात गेली. व बाकड्यावर बसून भज्ज्याची ऑर्डर एका पोऱ्याला दिली. तसा तो भज्जी घेऊन त्यापुढे ठेवून गेला. इतक्यात दोन तरुण मुले हॉटेलात आली. त्यांनी भज्ज्याची ऑर्डर दिली. व इकडे तिकडे बघत तो फिरून फिरून एखाद्या मारक्या म्हशीगत शांतीकडे पहाय लागला होता. आपल्या शेजारील मुलाकडे न पहाता तो म्हणाला, “ काय सदा आज काय आज पेठ एकदम झकाकाय लागलीय.”

तेव्हा तो दुसरा त्यास म्हणाला, “ तर काय, चांदण्याच उतरल्यात की जमिनीवर की स्वर्गातील अप्सरा बघ.” तेव्हा शांतीला व वज्रेला ही मुले आपल्याला बोलत्यात याची जाणीव झाली. तेव्हा शांतीने पाणी पित्याल्या ग्लासला हात घातला. ती तामसी स्वभावाची आहे. हे जाणून वज्रेन तिच्या हातावर हात ठेवला.  व शांत राहण्यास सांगितले. तेव्हा तिने त्या मुलांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले. व भज्जी खाल्ली.

तेव्हा त्यातील एकजण म्हणाला, “काय वर्षाची भुकेली आहेत पाखर वाटत.”

तेव्हा शांतीच्या डोळ्यात अंगार फुलत होते. पण ती शांत राहिली. त्या तिघींनी भज्जी खावून बिल भागवले. व बाहेर पडलीत. व त्या तिघी उरलेला बाजार करू लागल्या. तशी ती दोघे जण त्यांच्या शांततेचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करत होती. त्या बाजारपेठेतून सरळ गावच्या वाटेला लागल्या. जशा त्या वाटेला लागल्या तशीच ती मुले ही त्या मागोमाग जाऊ लागली. एक मैलभर अंतर चालल्यावर त्यांना वाटेत राईच्या डोंगरातून आलेला ओढा लागला. त्यांनी ओढा पार केला. ती मुलेही मागोमाग होती. अचानक त्या मागे फिरल्या. तशी ती मुले थबकली. तरीपण धाडसाने त्यातील पाटलाचा मुलगा पुढे झाला. व शांतीच्या नजरेत नजर भिडवन्याचा त्याने प्रयत्न केला. तशी ती त्याला म्हणाली,  “ काय दिवस भरलेत वाटत तुझ.”

तसा तो म्हणाला, “ होय, तुला आज प्रथम बघितलं व मी तुझ्या प्रेमात पडलो.”

तशी शांती म्हणाली, “ होय का? मला पण बोलायचं आहे. इथ तू माझ्या प्रेमात पडलास. व माझ्या पायातील कापशी वाहन ही तुझ्या प्रेमात पडली. भेटणार काय तिला.”

तशी वज्रा त्याला म्हंटली, “ हे बघ तुला हाड पाहिजे असतील जाग्यावर तर माग फिर व चालता हो इथून, नाहीतर वैद्याचा पत्ता मागवून ठेव पोहचवू तुला. आमच्या नादाला लागशिल तर बरगडीच्या फुकण्या करून चुलीत कोंबायची पाळी आणू नकोस. जा गुमाण माग. या बरगड्या म्हातारं पणापर्यंत जपाव्या असं वाटतं असेल तर जा माग.”

त्यांचे हे धिटपणाचे बोलणे ऐकून तो म्हणाला, “ तुमचे हे नाजूक हात ते काय बिघडवणार माझं, ते तर पोळ्या लाटायच्या कामाचे.”

तेव्हा आतापर्यंत गप्प बसलेली साकरी तिला म्हणाली, “ काय गावाकडे लाकडे नदीवर ठेवून आलास वाटत. त्या फक्त बरगड्या मोडायच बोलतात मी तुझ्या डोक्याचा फुटबॉल करायचं म्हणते.”

तेव्हा तो कुस्तितपणे म्हणाला, “तुमच्या सारख्या छप्पन जणींना मी नाक घासायला लावलेय. तिथे तुमची काय बिशाद.”

तेव्हा शांती म्हणाली, “ त्या छप्पनजणी म्हणजे आम्ही नव्हे. सगळ्या बिळात काय उंदरे नसतात, व विरोळे ही. आम्ही सह्याद्रीच्या नागिनी आहोत नगिणी. ज्यांच्या चावण्याने पाणी सुद्धा मिळायचे नाही.”

तस तो पुढे आला व त्याने शांतीच्या रट्टयाला हात घातला. ते पाहून वज्रा चिडली. तिला शांतीला असे धरणे आवडले नाही. त्याच्या डोळ्यातील लाली त्यांनी ओळखली. तिने सर्व ताकदीनिशी त्याला ढकलले. परिस्थीती लक्षात घेता साकरी जवळच्या फडात घुसली. व तिने त्यातले दोन ऊस मोडून आणले. व शांतीकडे देत. तो उभा राहण्याच्या आधीच त्याला बडवायला सुरूवात केली. त्यावर अशा या तिघी चवताळून पडताच. त्या बरोबर आलेलं पोरग घाबरल. व मागे पळालं. त्या तिघी जवळपास काय सापडलं त्या वस्तून त्याला मारत होत्या. त्याला सावराय त्यांनी वेळच दिला नाही. इतक्यात एक सायकलस्वार तिथे आला व त्याने थांबून त्यांचे भांडण मिटविले. व त्या मुलास पिटाळले. त्याची चांगलीच जिरली होती. या अशा मुलींचा रणावतार बघून त्याचे धाबे दणाणले. दोन चार गड्यांना लोळवेल असा गडी त्याला यांनी सळो की पळो केले. तो गुमान माघारी निघून गेला.

तो जाताच त्या तिघींनी उसासा टाकला. थोड त्या पुढे चालत गेल्या. व एका झाडाखाली बसून विश्रांती घेऊ लागल्या.

शांती मात्र वज्रेकडे पाहत होती. ती वज्रेस म्हणाली, “ आज काय लक्ष्मी अंगात शिरली होती वाटत. आमच्या पेक्षा तूच त्याला लई बडवलास. वाटत नव्हत या अबोल देहात एवढी प्रचंड ताकद आहे. मारखाऊन बसेल महिनाभर पाट चोळत.”

तेव्हा वज्रा म्हणाली, “ मारू नाहीतर काय त्याची पूजा करू. सरळ अंगाला हात लावतो पोरींच्या बापाची पेंड वाटली का? तो थांबला असता अन् काय आगळीक केली असती तर त्याच उर फोडून रागातच पितो बघ.”

तेव्हा साकरी म्हणाली, “ त्याच्या घरातली त्याला बघून काय म्हणतील.”

तेंव्हा शांती म्हणाली, “ काय म्हणतील आलाय प्रसाद घेऊन.अन काय.”

त्या तिघी हसू लागल्या. थोड्या वेळाने त्या बाजाराच्या पिसव्या घेऊन घरच्या वाटेला लागल्या. घरी जाताना त्यांनी पक्के ठरवले की झालेला प्रसंग कुठेही बोलायचा नाही.

तेव्हा पासून त्या कधीही बाजाराला एकत्रितच जायच्या. तो मात्र ह्या दिसल्या की गप्प खाल मान घालून निघून जायचा.

…… …… …… …… …… …,.. …….



कथा वाकाटखोर्याची भाग २५

 २५)दादाची सायकल लेखक :  निशिकांत हारुगले. व्यंकू आता खूप मोठा झाला होता. तो कॉलेजला जात असे. घराच्या गरीब परिस्थितीमुळे वज्रेला शाळा सोडावी...